सखिची शिकवण... तीन सुखिया ते तेजू दरम्यान...
कालच गाडीने आजारी सखीला तीनसूकियाला आणले होते...
सखीचा एक पाय आणि पायाची हाडे पूर्ण निकामी झाली होती... मेजर ऑपरेशन होते... मॅकेनिक डॉ. राजू संपूर्ण दिवस ऑपरेशन करत होता आणि सायंकाळी सखीची सर्जरी पूर्ण झाली होती...
रीकव्हारी वॉर्ड मध्ये आणल्यावर... थोडा वेळ तिच्या हाताला धरून फिरवून आणले... अजूनही मागच्या पायातून खुडखुड आवाज येत होता... डॉ. राजुने पुन्हा एक मायनर सर्जरी केली... आता सखी तयार झाली होती... कीबीतूला सफर करत जायला...
पण त्या आधी प्लेन रस्त्यावर तिला टेस्ट राईड द्यावी लागणार होती... मग ठरले तीनसुकिया ते तेझू ही १३४ किमीची सफर सखीने बारा तासात पूर्ण करायची... तरच ती किबीतू साठी क्वलिफाय होणार होती...
सकाळी सहा वाजता विवेकानंद केंद्र तीनसुखिया येथून सखीची टेस्ट राईड सुरू झाली... सकाळीच विवेकानंद केंद्र शाळेचा काही स्टाफ हजर होता...
सखिबरोबर फोटो काढायला... तो गेटवरचा शिपाई सुद्धा फोटो काढायला पुढे होता... केवढा सन्मान सखीचा...
पहिला पडाव तीस किमीवरचे डुमडूमा गाव होते... त्याच्या पाच किमी अलीकडेच डुमडूमाचे सायकलिस्ट राजेंद्र आणि अनिल कुमार यांची भेट झाली...
थोड्याच वेळात डुमडूमा गाठले... पावणे दोन तासात हा पडाव आरामात पार झाला होता ... तेथे राजेंद्रने नाष्टा खाऊ घातला...नंतर अनिलने फुलाबारी पर्यंत... तर राजेंद्रने काकोपठार पर्यंत सायकल साथ दिली... पुन्हा राजेंद्रने काकोपठार येथे नाश्त्याची ट्रीट दिली... सोबत खूप फोटो काढले...
पुढे काकोपठारच्या अभिरुची क्लबने आसामी गमचा देऊन सन्मान केला... खर तर हा सखीचा सन्मान होता...
कारण आज ती पुन्हा जोमाने तयार झाली होती किबीतू साठी...अरुणाचल चेक पोष्टवर पोलिसांनी आगळा वेगळा सन्मान केला... केळ्याचा घड आणि किलोभर संत्री... आणि पाण्याच्या तीन बाटल्या दिल्या...
पुढे नामसाई येथील विवेकानंद शाळेत सखीचे स्वागत झाले... तिला पाहायला शाळेतील सर्व मुले गोळा झाली होती...
अलुबारी पुलावर येऊन निसर्गात रमली सखी... लोहित ब्रह्मपुत्र नदीवर असलेल्या या पुलावर थोडा वेळ विसावली...
अंधार पडायच्या आत पोहोचायचे होते तेजूला... सखीला सांगितले मला थोडी विश्रांती देशील काय... सखी गालात हसली... चौखम येथे मला केक आणि चहा पाजला...
आता शेवटचे ३४ किमी पार करायचे होते... अडीच वाजले होते... आणि अंधार व्हायच्या आधी तेजू गाठायचे होते... सखीचा वेग वाढला... एका दमात वीस किमी पार केले... शेवटच्या १४ किमी पॅच मध्ये जंगल लागले... चार वाजले होते... निबीड जंगलामुळे रस्ता अंधुकला झाला होता... थंडी वाढू लागली होती... मागची लाल ब्लिंकर लाईट चालू केली... अंगाशी थंड वारे झोंबी करत होते... हिरवे विंड चीटर घट्ट बंद केले... पुढची पांढरी लाईट चालू केली... सखीचा वेग मंदावला होता... जंगल पार झाले... भूक लागल्यामुळे जवळच्या टपरीवर चहा आणि बिस्किटांवर ताव मारला...
शेवटचे पाच किमी राहिले होते... चहापान करून साडेपाच वाजता शेवटच्या पाच किमीची राईड सुरू केली... या पॅच मध्ये सतत स्पीड ब्रेकर होते... त्यावर मागचे कॅरियर डुगडूगू लागले आहे याची जाणीव झाली... त्यामुळे हॅण्डल सुद्धा डुचमळू लागले... सखीचे काही स्क्रू ढिले झाले आहेत काय याची तपासणी करणे तसेच तुटलेले कॅरियर रिपेअर करणे आवश्यक होते...
तेजुमध्ये प्रवेश केला... पाठीवरच्या छोट्या बॅगेचा चेन रनर खराब झाला होता... तो सुद्धा बदलून घेतला...
घड्याळ टॉवर चौकात किबितूच्या राईडसाठी खाऊ घ्यायला थांबलो... तेथे रायडर आयुष साहूची भेट झाली...
सहा वाजता रमत गमत सखी विवेकानंद केंद्र शाळेत पोहोचली... आणि म्हणाली "मला उद्या विश्रांती हवी आहे... माझे सर्व ढिले झालेले स्क्रू आणि कॅरीयर उद्या दुरुस्त करून परवा सकाळी किबीतू राईड सुरू करूया"...
तिच्या आदेशाला मान देण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता...
"आज सखिने १३४ किमी पूर्ण केले होते आणि आजच्या टेस्ट ड्राइव्ह मध्ये शंभर पैकी शंभर गुणांनी पास झाली होती... सलाम तिच्या जिद्दीला"...
सखी कडून सतत काहीतरी शिकतो आहे... हेच आजच्या राईडचे फलित होते...
मंगल हो... !!!
Nice sir
ReplyDeleteVery nice sir👍👍
ReplyDeleteकाय सुंदर लिहिता सर तुम्ही. म्हणूनच तुमचे असे सर्व लेख आवर्जून वाचतो.
ReplyDeleteखुपच छान सर 👍
ReplyDeleteखुप सुंदर लिखाण. असेच लिहीत रहा.
ReplyDelete