काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारीत भेटलेले व्यक्तिमत्व... २१ फेब्रुवारी २०२५
केरळचा राजन अण्णा...
केरळ मधील करीनकपारा गावात केळी घ्यायला थांबलो... सकाळचा ब्रेक फास्ट झाला नसल्याने केळी खाऊन दोन तास राईड करायची होती...
राजन स्टोअरचा मालक राजन अण्णा गल्ल्यावरून उठून बाहेर आला... आस्थेने मल्याळम मध्ये चौकशी करू लागला... त्याचे मल्याळम आणि आमचे हिंदी इंग्लिश मेळ खात नव्हते... पण त्याच्या बोलण्यातली कणव जाणवत होती... तेवढ्यात दुकानात असलेला त्याचा मुलगा अनिरुद्ध बाहेर आला... त्याला इंग्लिश येत होते...
एक किलो केरळी वेलची केळी सत्तर रुपयात दिली... किमान अठरा केळी आली असावी... गोड केरळी अप्पे सुद्धा घेतले... सर्वांनी केळी आणि अप्पे गटकावले... आणि तयार झाले पुढील दोन तास राईड करायला...अनिरुद्धने आमची चौकशी करून मल्याळम व्यतिरिक्त कोणतीही भाषा न समजणाऱ्या वडिलांना सर्व माहिती दिली... राजन अण्णा एकदम खुश झाला...केळीचे पैसे नाकारू लागला... बळेच पैसे दिले त्याला...
आम्ही पुढे निघालो... तर राजन अण्णा मागून स्कूटर वरून आला आणि थंड पाण्याची बाटली देऊन गेला...
राजन अण्णाला आमचा काश्मीर ते कन्याकुमारी साहसी सायकलिंगचा उद्देश समजला होता... या जागतिक विक्रमात त्याने सुद्धा खारीचा वाटा उचलला होता...
निरपेक्ष उद्देश आणि लोककल्याण... यातूनच प्रेमाचा मार्ग जातो... हेच राजन अण्णाच्या कृतीतून दिसते...
सतीश जाधव, सायकलिस्ट
7977690693
No comments:
Post a Comment