आग्र्याच्या बसै परिसरात असणाऱ्या आँचल किरण धर्मशाळेतून आम्ही दहा सायकल मावळे निघाले दहा किमी अंतरावर असलेल्या... कोठी मीना बाजार हवेलीकडे...
हिच ती हवेली जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे ९९ दिवस वास्तव्य होते... त्यांना नजरकैद करून ठेवले होते... आणि १७ ऑगस्ट १६६६ रोजी अतिशय चातुर्याने छत्रपतींनी आपली सुटका करून घेतली होती...
दहा किमीची सायकल रपेट करत राजा जय किसनदास भवन वाड्याजवळ पोहोचलो...
उंच टेकडीवर असलेल्या या वाड्याच्या उजव्या बाजूच्या उतारावर ती ऐतिहासिक वास्तू नजरेस पडली... आणि मन भरून आले...
स्वराज्याच्या इतिहासात अमर झालेल्या त्या पावन भूमीवर उभं राहण्याचा क्षण आज लाभला... आग्र्यातील मीना बाजार सराई मधील राजा जय किसनदास भवन वाड्याजवळची कोठी मीना बाजार हवेली पाहण्याचे भाग्य मिळाले...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हवेली... या हवेलीच्या दारातून आत जाताना प्रत्येक पावलाबरोबर हृदयात आदराचे तरंग उमटत होते...
हवेलीच्या प्रांगणात हनुमानजीचे मंदिर होते...
जीर्ण झालेल्या भिंतींमधून इतिहासाची स्पंदने जाणवत होती... हवेत आजही स्वराज्याची शौर्यगाथा दरवळत होती.
१५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिवसाची ही आगळी वेगळी भेट होती... स्वातंत्र्याच्या आनंदात... पावन स्थळी उभं राहून मन कृतार्थ झालं... ही क्षणचित्रे हृदयात कायमची कोरली गेली आहेत... छत्रपतींच्या शौर्याची प्रेरणा देणारे हे दीपस्तंभ सदैव उजळत राहतील...
सतीश जाधव
7977690693
Nice Satish sir and team !!
ReplyDelete