नारळी पौर्णिमेचे मंगल क्षण...
दि०९ ऑगस्ट २०२५
आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा मंगल सोहळा… आर्य समाज, लोअर परळ येथे चतुर्वेद शतकम् पारायण महायज्ञ होता.. या पवित्र कार्यक्रमात सहकुटुंब सहभागी होण्याचे भाग्य लाभले...
आगमन होताच, पुरोहित पं. भास्कर शास्त्रींनी प्रेमळ हसऱ्या चेहऱ्याने कपाळावर शुभ्र चंदन लेप लावून केलेले स्वागत जणू आशिर्वादाचा शीतल स्पर्शच होता...
त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने, मंत्रोच्चारांच्या निनादात, यथासांग होमहवन झाले. यज्ञकुंडातून निघणाऱ्या धुराचा सुगंध आणि मंत्रांच्या लयीने मन एकदम पवित्र आणि प्रसन्न झालं...
विशेष म्हणजे, यज्ञकार्य पूर्ण झाल्यावर पं. भास्कर शास्त्रींच्या पत्नी राजकुमारीताईंनी सर्वांच्या मनगटावर राखी बांधली… त्या क्षणी भावबंध, आपुलकी आणि संस्कृतीची अनुभूती झाली...
शेवटी अल्पोपहाराचा आस्वाद घेत, मनात समाधान आणि आनंदाची गोड आठवण घेऊन घरी परतलो...
आजचा हा मोठा दिवस... श्रद्धा, संस्कार आणि स्नेह यांच्या अनमोल धाग्यांनी गुंफलेली एक सुंदर आठवण बनून हृदयात कायम राहणार आहे...
सतीश जाधव
7977690693
खूपच छान सर!🌹👍
ReplyDeleteखूप भाग्याचा अविसमरणिय क्षण!
ReplyDelete