Wednesday, June 17, 2020
निसर्गाकडून निसर्गाकडे सायकल राईड
Saturday, June 13, 2020
सेंच्युरी राईड १३, जून २०२०
Wednesday, June 10, 2020
सह्या गोळा करण्याचा छंद दि.०९.०६.२०२०
Monday, June 8, 2020
Mumbai to Kanyakumari Cycling (Day Nine) 02.11.2019 Selam to Dindigal मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस नववा) सेलम ते दिंडीगल
Wednesday, June 3, 2020
निसर्ग वादळ आणि नाबाद 101 दि. 03.06.2020
Tuesday, June 2, 2020
गुलमोहर राईड 02.06.2020
Monday, June 1, 2020
पहिला पाऊस 01.06.2020
ओलसर रस्त्यामुळे गाड्यांचे लाईट परावर्तित होत होते. हायड्रेशन ब्रेक घेतला.
पक्ष्यांचे थवे विहार करत होते. माळे सारखे उडणाऱ्या फ्लेमिंगो मधील शेवटच्या पक्षाने पाण्यातील मासा पकडण्यासाठी डुबकी मारली. त्या डुबकी बरोबर पाण्यावर उठलेले तरंग, मनात झंकार उठवून गेले.
या पक्षांचे स्वच्छंदी जीवन पाहिले की वाटते; आपल्याला पंख असते तर गगनाला गवसणी घालणे किती सहज झाले असते.
Sunday, May 31, 2020
चेक पॉईंट सायकलिंग राईड 31.05.2020
31.05.2020
चेक पॉईंट सायकल राईड
गेल्या तीन दिवसात फक्त मुंबईत सायकलिंग केली. त्यामुळे मुंबई बाहेर जाता येईल काय?, तसेच अजून स्टॅमिना शाबूत आहे काय याची पडताळणी करण्यासाठी आजची राईड होती.
मुंबईवरून बोरिवली नॅशनल पार्क तेथून दहीसर टोल नाका पार करून घोडबंदर फाउंटन हॉटेल पर्यंत जाणे. त्यानंतर घोडबंदर मार्गे ठाण्याला जाऊन मुलुंड टोल नाका पार करून पुन्हा मुंबईला येणे हा आजचा रूट होता.
ठाण्यात राहणाऱ्या माझ्या समर्पयामि आणि आझाद पंछी सायकलिंग परिवारातील सदस्यांनी अजून मुंबईत सायकलिंग करण्याचे धाडस केले नव्हते. त्यांना आजच्या सायकलिंगमुळे मार्गदर्शन होणार होते.
विजय बरोबर मुंबई वरून सायकलिंग सुरू केली. गोरेगावला अतुल जॉईन झाला.
दोन्ही चेक नाक्यावर कोणतीही अडचण आली नाही. पाणी आणि नाश्त्याचा मुबलक साठा बरोबर होता. परंतु आठ वाजल्या नंतर उन्हाच्या चटका जाणवू लागला. त्यामुळे आमच्या कडचे पाणी संपले. म्हणून बिस्लेरी पाणी विकत घ्यावे लागले.सध्याच्या उष्ण वातावरणात भरपूर पाणी घेऊनच सायकलिंग करणे अत्यावश्यक आहे. विशेष म्हणजे घोडबंदर रस्त्यावरील ओव्हळा गावात टपोरी टपोरी जांभळं मिळाली. तेथेच विजयने छोटे छोटे चोखायचे आंबे सुद्धा घेतले.
पुढे ब्रह्मांड जवळ हायड्रेशन ब्रेक घेतला तेव्हा नास्त्या बरोबर जांभळं खाणं, ही बाब लहानपणातील रानामेवा खाण्याच्या आठवणींना उजाळा देऊन गेली.
अतुल आणि विजयसह दोन महिन्याच्या लॉक डाउन नंतर केलेली 92 किमीची मोठी राईड सर्वार्थाने यशस्वी झाली होती.
मुंबईतून ठाण्यात सायकलींग करत जाणे किंवा येणे यात आता कोणतीच अडचण नाही. फक्त सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
माझ्या सर्व सायकालिस्ट मित्रांना विनंती आहे, बाहेर पडा निर्धास्तपणे सायकलिंगसाठी.
आजची राईड सर्व सायकालिस्ट मित्रांना समर्पित.
सतीश जाधव